Wednesday, April 27, 2011

आयुष्य कधीतरी इंद्रधानुश्यासारखे भासते. इतके वळण घेत आयुष्य जात असते. हे एका ठराविक उंचीवर पोहोचल्यावर दिसते. आज मलाही या वळणाचा नव्याने परिचय झाला. काही लोक फक्त काही क्षणांसाठी आपल्या आयुष्यात येतात , पण त्यामुळे आपले संपूर्ण आयुष्याच ढवळून निघते . त्यांची ये जा आयुष्यात चालूच असते. एक मित्र म्हणून आपण त्यांच्याशी बोलतो, नव्याने पुन्हा नात्याला सुरुवात करतो, पण गंमत अशी असते कि ते नाते नव्याने फक्त आपल्यापुरतेच चालू झालेले असते. समोरची व्यक्ती मात्र जुन्या नात्याचेच धागे पकडून बसलेली असते. अशावेळी आपल्याल्या अशा नात्यांना न्याय देणे कठीण होऊन बसते. प्रतेय्क माणूस हा नेहेमी मनामध्ये दोन कप्पे करून चालत असतो. एक कप्पा वर्तमान काळासाठी आणि दुसरा भूतकाळसाठी.बऱ्याचद भूतकाळ हा रम्य आठवणी देणारा असतो, पण काही माणसांची आठवण काढली तर फक्त आणि फक्त मनाला टोचणार्या वेदनाच होतात.

No comments:

Post a Comment