अस अचानक काहीतरी घडते आणि आयुष्य एका क्षणात बदलते... आणि गम्मत अशी असते की
हा एवढा मोठा बदल घडत असताना हे आपल्यासोबत होणार आहे याची पुसटशी कल्पना देखील
आपल्याला नसते... आपण सगळेच अनभिज्ञ असतो या बदलापासून... आपल्यापैकी
प्रत्येकाच्या आयुष्यात हे असे घडले असेल किंवा घडणार असेल.... पण या बदलाच्या
प्रक्रियेतून प्रत्येकाला जावे लागतेच.... कधी हे बदल चांगले असतात तर कधी
वाईट....कधी हसवणारे तर कधी रडवणारे... पण आपल्या मर्जीने किंवा मर्जी विरोधात बदल
हे घडत असतात... आणि आपल्या आयुष्याला एक नवा रूप आणि नवा वळण देत असतात.... कधी
कधी हा बदल स्वीकारणे सोपे असते तर कधी कठीण... पण जशी जशी वेळ सरत जाते आपणही या
बदलना सरसावत जातो... पण एक सांगू हे अशा प्रकारचे बदल घडणे आयुष्याला एक अर्थ देतो...
जो खूप गरजेचा असतो....
Saturday, October 8, 2011
बऱ्याचदा काही गोष्टी या काही ना काही कारण घेऊन घडत असतात... त्या का घडतात, कशासाठी घडतात त्यामागे काहीच कारण असणे गरजेचे असते असे नाही... कदाचित काहीही करणान नसताना घडण्याची वेळ आलेली असते म्हणून त्या गोष्टी कदाचित घडत असतील... पण आजपर्यंतर ज्या गोष्टी काळाच्या पडद्याआड असतात त्या अचानक ध्यानी मनी नसताना का घडाव्यात.... हे अजूनही एक कोडे आहे.... प्रत्येक गोष्टीला काही तरी कारण असते असे म्हणतात... मग काही गोष्टी अवेळी आणि बिना करणाच्या का घडाव्यात.... काही प्रश्न आयुष्यात अनुत्तरीत राहिलेले बरे असतात.... कारण त्यांची जर उत्तरं मिळाली तर कदाचित जास्त दुरावे निर्माण होण्याची शक्यता असते....
Subscribe to:
Comments (Atom)