Saturday, May 7, 2011

आई ....


सांगता  येणार नाही आई मला , रोज तुझी किती आठवण येते..
रोज रात्री थकून घरी आल्यावर... तुझी कुशी आजही आठवते..
जेव्हा वाटते शांत झोप हवी आहे.. तेव्हा तुझी मांडी आठवते...
दिवस वाईट गेला कि तुझी हळवी मिठी आठवते...
आणि आनंदाच्या क्षणी  तुझ्या डोळ्यात येणारे पाणी आठवते...
कसा सांगू तुला आई, रोज तुझी किती आठवण येते...

मी फोने केला नाही कि तू कासावीस होतेस...
आणि फोन केल्यावर काळजीपोटी तू मला ओरडतेस..
तुझ्या ओरडण्यामागाचे  प्रेम मला जास्त आवडते...
कसा सांगू तुला आई, रोज तुझी किती आठवण येते...

जेव्हाही वाटते  कि हे अशक्य आहे..
तेव्हा फक्त तूच धीर देताना आठवतेस...
माझ्या प्रत्येक संकटात देवापुढे  तू प्रार्थना करते...
तुझे आशीर्वादाच मला लढायची ताकद देतात..
रोज रात्री तुझ्या प्रार्थना माझ्यापर्यंतर  पोहोचवतात...

खरा सांगते आई ... पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे...
सगळी दु:ख विसरून तुझ्या कुशीत निवांत झोपायचे आहे...
पुन्हा एकदा तुझ्या कडेवर बसून..हे जग पहायचे आहे..
आई मला पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे... 
तुझ्या गळ्यात पडून पुन्हा... तुझी किती आठवण येते ते सांगायचे आहे...

Wednesday, May 4, 2011

लग्न म्हणजे व्यवस्था आहे का?


"ठाकून ठोकून  आकार देता येईल ,आपल्या सोयीनुसार, स्वभावानुसार वाकवून, बदलून घेता येईल अशी एक व्यवस्था म्हणजे लग्न..." हे वाक्य आहे  शोभा डे  यांच्या स्पाऊस - संसार सुखाचे रहस्य या पुस्तकातले..... हे वाक्य नजरेस पडताक्षणी मनाला  खटकले... लग्न म्हणे काही व्यवस्था नाही.... लग्नाला व्यवस्था असे म्हणणे मला आवडले नाही... लग्न हि संस्था आहे.. तिला आकार देता येत नाही... झाडाला बिलगून वाढणाऱ्या वेलीसारखी ती वाढत जाते... आणि आयुष्याला एक अर्थ प्राप्त होतो.. ही वेल फुलते, फुलवते आणि समोरच्या  माणसाला भरभरून आनंद देते...हे सर्व असताना लग्न ही व्यवस्था कशी होऊ शकते? दोन माणसांच्या मर्जीने निर्माण  झालेले नाते ही व्यवस्था कशी असू शकते ????

लग्न ही व्यवस्था म्हणून समजणारे आणि त्याचप्रमाणे जगणाऱ्या जोडप्यांना पाहून मला आश्चर्य वाटते.  किती तांत्रिकपणे वावरत असतील ही माणसे... स्वतःला त्रास करत ,दुसऱ्याची मर्जी सांभाळत... स्वतःच्या मनाचे विदीर्ण तुकडे करत आपले आयुष जगताना यांच्या मनात काहीच येत नसेल का? म्हणूनच लग्न ही व्यवस्था आहे असे म्हणायचे का? जर असे असेल तर 'लग्न' या व्यवस्थेत नक्की कीव करावी तरी कुणाची? त्यात अडकलेल्या माणसांची, समाजाची, लग्नाची कि स्वतःच्या सोयीनुसार बदलणाऱ्या या व्यवस्थेची....

लग्न ही व्यवस्था म्हणता म्हणता अशा अवस्थेला पोहोचली आहे की नेमक्या कोणत्या शब्दात तिचे वर्णन करावे हेच समजत नाही... बदलत्या दुनियेच्या नजरेतून पाहताना असे जाणवते की प्रत्येकजण स्वतःच्या सोयीनुसार नात्यांची गुंफण करतो आहे.. जिथे समर्पण आहे अशी नाती ओझी वाटतात आणि ज्या नात्यांमध्ये एकमेकांशी काहीही देणे घेणे नाही अशी नाती संस्कृती म्हणून समाजात आपले बस्थान बसवता आहेत..  नेमकेपणे सांगता येत नाही पण लग्नाचा प्रवास हा नेमका कुठल्या दिशेला होतो आहे याचा पत्ता लागत नाही.. आणि शोध घ्यायचा म्हटले तर कुठून घ्यावा हेच काळात नाही.......

आपल्या आजू बाजूला नजर फिरवल्यावर देखील अशी विखुरलेली नाती दिसतील.... वरून सर्व काही व्यवस्थित असणारी नाती आतून किती कमजोर आणि जीर्ण झालेली आहेत याचा आपल्याला पत्ता लागणे देखील कठीण आहे.... अशी ही समाजातली सगळ्यात महत्वाची लग्न संस्था आज कुठे चाली आहे.. हे कुणालाच माहिती नाही.... जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की सांगा.... हा शोध घ्यायला  मलाही आवडेल.....

Monday, May 2, 2011

हे असेही होते ना...

गाठी सोडवण्याच्या नादात कधी कधी आपण गुंता वाढून बसतो आणि तो नुस्तान गुंता नसून न सुटणार गुंता आहे ,हे आपल्या फार उशिरा लक्षात येते...  Sometimes we really bound ourself with so much of responsibility which is actually not at all required..... पण विचारांच्या नादात हा विचार आपल्या मनात येताच नाही...

या विचाराशी मी पूर्णतः: सहमत आहे. खरा पाहता आपण स्व:तवर इतक्या जबादर्य लादून घेतो आणि स्व:ताच्या मनाला सांगतो कि आपण सोडले तर दुसरा तिसर्या माणसाला या गोष्टींशी काहीही देणा घेणा देखील नसते... Love + Sex + Commitment  यात्रीकुतात अडकलेली आजच्या पिढीची अनेक तरुण नाती एकमेकांशी पकडापकडीचा खेळ खेळताना दिसतात. मागच्या पिढीचे असणार नाते त्यांना बोरिंग आणि शिळे वाटते... त्यात नवीन काहीही नाही अशी आजच्या या तरुण पिढीची समजूत आहे... पण वाईट या गोष्टीचे वाटते कि Love आणि  Sex  या दोन आधारांवर येऊन हि नाती बिथरतात... Commitment  पर्यानातर त्यांचा प्रवास होताच नाही..... त्रिकुट म्हणता म्हणत फक्त आपल्या सोयीचे दोन पर्याय निवडून हे मंडळी आजची नाती जोडतात आणि तोडतातही...  सुदैवाने काही १ -२ % नाती या Commitment  पर्यंतर प्रवास करतात ती नाती काही वर्षातच एकमेकांवरच्या विश्वासाच्या अभावामुळे दुरावलेली दिसतात... नेमकेपणाने सांगता येणार नाही पण नात्यांची हि सध्याची अवस्था पाहता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ही नाती कोणत्या स्वरुपात आढळतील याचे भाकीत करणे अवघड आहे..

झपाट्याने काळ बदलतो आहे... नवीन नवीन गोष्टींचा  स्वीकार करत आपण काळाबरोबर बदलतो आहे... बदलत्या काळाच्या वेगाचा कायदा आपण पाळतो आहे... कधी पडतो आहे... कधी धडपडतो आहे...कधी वात चुकतो आहे.. तर कधी ठेचालतो आही... पण कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही अवस्थेत काळाबरोबर धावण्याचा अट्टाहास आपण सोबत घेऊन चाललो आहे... या धावण्याच्या नादात बर्याच गोष्टी मागे सुटता आहेत..कुठेतरी पडता आहेत... पुढच्या वाल्नवत त्या भेटीलच असे गृहीत धरून आपण पळतो आहे... 

जीवनाच्या गाडीपेक्षा platform वरची रेल्वे जास्त महत्वाची आहे... आपल्या प्रिया व्यक्तीला केलेय promis पेक्षा बोस ने दिलेले मनात नसले तरी महत्वाचे आहे...
संद्याकाळी क्रिकेट मतच पेक्षा अलिएइ मीटिंग महत्वाची आहे... सकाळी बायको सोबत बसून एक घोट चहा आणि दोन प्रेमाचे शब्द या पेक्षा ट्रेनची वेळ आणि taffic  ची भीत जास्त आही..... आई शी बोलताना आलेला ग्राहकाचा काल महत्वाचा आहे... अशा असंख्य गोष्टी आहेत.... ज्या तुमच्या माझ्यासोबत घडतात.... या सर्व गोष्टी करताना आपल्या प्रिया व्यक्तींच्या आनंदाचा बळी आपल्याला द्यावा लागतो..... किती विचित्र आहे न हे सर्व....... ज्यांच्या साठी या सर्व गोष्टी करतो त्यांचा द्यायला आपल्याकडे वेळ नाही..... विचार करा...