Thursday, August 4, 2011

असच काहीतरी..... सहज वाटले म्हणून ....


काहीतरी नवीन घडावे असे रोज वाटत असते... पण नक्की काय घडावे हे माहिती नसते.... काहीतरी बदल हवा असतो.... रोजच्या जगण्यापेक्षा काहीतरी वेगळे हवे असते.. पण काय हे माहिती नाही.... मला  वरचे वर असे वाटते आहे की काहीतरी भन्नाट असा घडावे..... पण काय??? हा विचार आला की मी थांबते..... अशी अवस्था तुमची पण असेल... तेच तेच रुटीन जागून तुम्हालाही कंटाळा आला असेलच.... आपण किती वेडे असतो ना... आपल्याला नेहेमी वाटते की काहीतरी बदल घडावा.... काहीतरी वेगळे व्हावे.... पण नेमकेपणे काय हवे आहे हेच माहिती नसते.... कधी कधी आभाळ भरून आल्यवर वाटते की हा पाऊस फक्त माझ्यासाठी का पडत नाही... उन्हातून चालताना वाटते की थोडीशी सावली फक्त माझ्या डोक्यावर का येत नाही... समुद्र किनारी बसल्यावर वाटते की हा समुद्र माझ्याशी का बोलत नाही... आणि वार्याची झुळूक आली की असे वाटे की मला असा का उडता येत नाही.... असे अनेक वास्तवतेत कधीही न होऊ शकणाऱ्या गोष्टीचा विचार करतो आपण..... मनाला थोडावेळ का होईना थोडासा विरंगुळा देतात म्हणून करतो... की मनाला समाधान मिळावे म्हणून.... हल्ली हे अस नेहेमीचाच झाला आहे... कधी ही काहीही वाटते.. का वाटते ,कशाला वाटते नाही सांगता येत.... पण वाटते.... बसल्या बसल्या एक असाच विचार मनात आला की आपल्याला आयुष्याकडून नक्की काय हवा आहे... चौकटीत आखून दिल्याप्रमाणे आयुष्य नाही जगायचे आहे.. कारण आपण ठरवलेल्या गोष्टी होतीलच असे नाही... आपण निश्चित ठिकाणी पोहोचू असे नाही.... पोहोचलो तरी ठरवलेल्या वेळेत पोहोचू असे नाही... आणि ठरवलेल्या वेळेत पोहोचलो तरी जे हवे आहे ते तेव्हा मिळेलच असेही नाही.... आयुष्य नावाच्या गीफ्टचे  प्लॅनिइंग करता येत नाही ... कारण पुढच्या क्षणाची शाश्वती नसते... येणार क्षण आपल्याला हवाल तसं असेलच याची खात्री नसते.... तरी ही आपण आयुष्यावर प्रेम करतो... खूप जास्त प्रेम करतो....पुढच्या क्षणाची परवा करायची नाही असे ठरवले तरी ही जीवन विमा  पॉलिसी काढतो....  हवा तसं जगायचे ठरवले तरी नोकरीसाठी बांधील राहतो.... आभाळात उडायची स्वप्न बघताना पायात लोखंडी साखळदंड बांधतो.... कितीही स्वतःला स्वतंत्र म्हटले तरीही कुठे ना कुठे जखडून ठेवतो...
कधी कधी असे वाटते की आरशासारखे मन घासून पुसून चकचकीत का करता येत नाही... जे मनात आहे ते समोरच्या माणसाला का सांगता येत नाही... असे वागलो तर नाती जस्त वेळ नाही की टिकून राहणार... लोणच बराच वेळ टिकायला आपण त्यात तेल आणि मिठ घालतो..... मग नाती टिकवायला का कोणी कुठचे उपाय करत नाही....स्वतःचे स्टेटस माणसे जपतात.. अहंकार जपतात.... राग रुसवे जपतात.. पण नाती का जपत नाही..... कोणी वाईट बोलले तर जन्मभर लक्षात ठेवतो.... पण चांगले वागले तर कोणाच्या का लक्षात राहत नाही....  माणूस हा एक विचित्र प्राणी आहे... त्याच्या अशा आणि अपेक्षा कधी संपत नाही.....  बदल हवा असतो पण बदल घडवण्याची मानसिकता नसते... काहीतरी करायचे असते... पण करण्याची हिम्मत नसते..... आणि स्वप्ना बघायची असतात पण टी पेलवण्याची ताकद नसते.... आपण सर्वही असेच आहोत.... असा नही वाट का की थोडासा बदलायला हवे... बदल होण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे...
 माझा प्रवास सुरु झाला आहे... तुमचा काय... निघालात की अजूनही विचारच करता आहात?????.... J

No comments:

Post a Comment